
जातनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय
प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेलं निर्णायक पाऊल आहे.

या जनगणनेमुळे देशातील विविध जातींच्या आर्थिक व सामाजिक स्थितीची अचूक माहिती उपलब्ध होणार असून, इतर मागासवर्ग, मराठा कुणबी,ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्यासह सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि प्रभावी धोरणे आखता येणार आहेत
परभणी जिल्हा पालकमंत्री सौ मेघना दीदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वात सेलू क्रांती चौक येथे भाजपा पदाधिकारी शहर अध्यक्ष अशोक शेलार, अशोक भाऊ अंभोरे, नगरसेवक मनीष भाऊ कदम, नगरसेवक दिशागत सर, कपिल फुलारी, कृष्णा गायकवाड,गणेश ढेगळे, विनोद शेरे,रवीचव्हान,नंदकिशोरजी* *पारिखा,किरण सवलगे, गोविंद शर्मा, अभय महाजन, कान्हा, वाल्मिक खुळे,सिराज भई,अमोल भोसले,भारत पवार,व्यकटेश भिसे,नागेश ठाकूर,अक्षय कोल्हाळ,अभि शिंदे, अशोक कुकडे, सावंत मामा, भागवत शिंदे,व कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली याप्रसंगी भारतीय जनता पार्टी सेलू शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.