नागरिकांनी घातले महावितरणच्या वाकलेल्या पोलचे श्राद्ध…

सेलू शहरातील शास्त्रीनगर अष्टविनायक मंदिर च्या पाठीमागील महावितरण चा खंबा खूप दिवस झाले वाकलेला आहे. वारंवार महावितरण ला सांगूनही त्यांनी काहीच कार्यवाही केली नाही. हा रस्ता कायम रहदारीचा आहे मंदिरामुळे येथे कायम गर्दी असते तसेच गल्लीतील लहान लेकर येथे खेळत असतात. याचा निषेध म्हणून शास्त्रीनगर येथील नागरिकांनी या वाकलेल्या खंब्याला हार घालून त्याचे श्राद्ध केले व या उपरही महावितरण ने हा खंबा बदलला येत्या आठ दिवसात बदलला नाही तर महावितरण कार्यालयात भीम मुदत ही आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. यावेळी जयसिंग शेळके, राजेंद्र करवा, राजेंद्र तोषनीवाल, आनंद सोनी, बाबा शेळके, अजय गजगमल, भागवत डवले, सोमेश काकडे, अभय भंडारी, रामा गाडेकर, गणेश गायकवाड, सचिन काबरा, विशाल सावंत व नागरीक उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button