
सेलू चे बिनायके कुटुंब आणि राजकोट चे वारिया कुटुम्ब यांचा शुद्ध जैन पद्धतीने विवाह सोहळा संभाजी नगर येथील जिमखाना क्लब येथे सम्पन्न झाला.
सेलू चे व्यावसायिक उद्योजक निलेश बिनायके यांची कन्या ची मेघा आणि राजकोट चे उद्योजक निलेश भाई वारिया यांचा मुलगा शाश्वत यांचा विवाह सोहळा जिमखाना क्लब येथे सम्पन्न झाला, ह्या सोहळा अत्यंत सादगीपूर्ण आणि पारंपारिक जैन पद्धतीने आयोजित करण्यात आला , ९४ वराती ना रेलवे स्टेशन वर स्वागत करण्या साठी १०७ वधु पक्षाकडील भाऊ बंध आणि सगे सोयरे होते,पारंपरिक राजस्थानी गाण्याने घूमर नृत्य करुन त्यांचा आगमन सोहळा पहाटे ०५.०० वाजता करण्यात आला.
आजच्या फास्ट फूड च्या युगात पूर्ण कार्यक्रमात कोठे ही फ़ास्ट फ़ूड चे व्यंजन नव्हते, जैन धर्म अनुसार कंदमुळ आलू , कांदे, लसुन आदि चा वापर नाही झाला, सर्वांचे जेवन सूर्यास्त होण्या पूर्वी करण्यात आले.

रात्रि संगीत कार्यक्रमात अत्यंत सादगी ने दोन्ही कुटुंबियांच्या वतीने नृत्य सादर करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी कोणताही कर्कश DJ शिवाय ब्रास बैंड च्या सुरात , वराती नवरदेवाला नटवून घेऊन आले, कोणत्याही पशु वर भारारोपन होऊ नये म्हणून घोड्या चा उपयोग टाळन्यात आला.
मुख्य लग्न सोहळा दुपारी १२.०० वाजता प्रारम्भ झाला .जबलपुर हुन आलेले शास्त्री विद्वान श्री विराग जी ह्यांनी शास्त्रोक्त पद्धति ने विवाह चे काय महत्व आहे हे समजावून सांगितले, सप्तपदी का करतात त्यावेळी प्रतिज्ञा घेतली जाते त्याचे महत्व पटवून दिले, उपस्थित असलेल्या ९५ टक्के पाहुनी मंडळी ने आम्ही प्रथमच ऐसा सोहळा बघितला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाश्चात्य संस्कृति चा सगळी कड़े बोलबाला होत असताना भारतीय आणि जैन संस्कृति जीवित ठेवन्याचा हा सोहळा काही और च होता. मंगलाष्टक चे गायन सेलू येथील प्रसिद्ध गायिका पूजा तोड़कर यानी केले.
सप्तपदी नंतर आहेर देण्याच्या विधिमधे गमंतीने वरपिता यांना स्त्री श्रृंगार करून वातावरण मजेशीर करण्यात आले.शेवटी बिदाई च्या समयी सर्व कुटुंबिय आंनद अश्रु ने भाव विभोर झाला आणि मुलीला विदा करण्यात आले.सगळ्यात शेवटी दोन्ही पक्षाने केशरी रंग एकमेकांना लावून आम्ही आता एक रंग झालो ऐसा सोहळा चे भरपूर कौतुक
अशी प्रतिक्रिया सर्व उपस्थित पाहुणे मंडळी ने व्यक्त केली.

ह्या विवाह प्रसंगी राज्यमंत्री मेघाना साकोरे बोर्डिकर,गोविन्द भाउ जोशी, प्राचार्य डी आर कुलकर्णी , जयप्रकाश बिहानी,विजय बिहानी,लघु उद्योग भारती चे रविंद्र वैद्य, मासिआ चे अध्यक्ष अभय हंचनाळ, विलास पहाड़े पैठण, राजकोट,मुंबई येथील उदयोजक, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगाना, आदि राज्यतुन मंडळी उपस्थित होती.
