
आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा—प्रा.आर एस.यादव..

दि.23मार्च रविवार रोजी शहरातील हुतात्मा स्मारक येथील योगा हॉलमध्ये शहीद दिनानिमित्त ‘निर्मिक गुणगौरव सोहळा’ संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प.सदस्य मुंजाभाऊ भिसे,प्रमुख मार्गदर्शक प्रा. आर .एस.यादव , प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सतीश आकात, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड,श्रीराम रेंगे , कवयित्री अश्विनी घोगरे, पि.के. शिंदे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि शहिद दिनानिमित्त शहिद भगतसिंग यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निर्मिक कोचिंग क्लासेसचे संचालक शुकाचार्य शिंदे यांनी दरवर्षी विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रेरणा मिळावी म्हणून हा गुणगौरव सोहळा घेत असल्याचे सांगितले. पत्रकार सतिश आकात यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे कष्ट लक्षात घेत महापुरुषांच्या विचार आणि कार्यानुसार आचारण ठेवून अभ्यास करण्यास सांगितले.सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी आई वडीलांचा आदर करुन ज्ञान देणाऱ्या गुरुजनांचाही सन्मान करावा असे आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा आर .एस यादव यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शहिद भगतसिंग यांच्या वाचनाबद्द्लच्या आवडीचे उदाहरण दिले.भगतसिंगाने देशासाठी लढत असताना फासावर जात असताना शेवटची इच्छा विचारली असताना भगतसिंगांनी मी तुरुंगात एक पुस्तक वाचत आहे,ते पुस्तक वाचून झाले की तुम्ही खुशाल फाशी द्या.या उदाहणाचा दाखला देत विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सांगितले . ते पुढे मार्गदर्शनात म्हणाले की विद्यार्थ्यांनी ध्येय उच्च ठेवून जिवनात यश संपादन करावं यासाठी विद्यार्थ्यांना गरुडाचे उदाहरण देत आयुष्यात यश मिळवून उंच भरारी घेण्यासाठी सांगितले.

त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला .सेलू मध्ये प्रथमच शासनाच्या `बेटी बचाओ, बेटी पढाओ ‘ या धोरणाला अनुसरून निर्मिक कोचिंग क्लासेस मधून वर्ग 10 वी बोर्ड परीक्षा मार्च 2024 मध्ये मुलींमधून 91.40% गुण मिळवून प्रथम येणाऱ्या कु. सोनाली पवार या विद्यार्थ्यांनीस ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार ‘देऊन गौरविण्यात आले.त्याचबरोबर क्लासेस मधून विविध स्पर्धा परीक्षा आणि क्लास मधील परीक्षेत यश प्राप्त
करणाऱ्या इतर 30 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश बरसाले, तर आभार प्रदर्शन सुरेश कुलकर्णी यांनी केले.कार्यमाच्या यशस्वीतेसाठी अंजली भुजबळ ,यशा कदम प्रमोद कदम ,ऍड.विजय लाटे यांनी परिश्रम घेतले.