लोकाश्रयातून ज्ञान मंदिरांचा विकास व्हावा:- डॉ कोठेकर..

कै.रा.कि.कान्हेकर शारदा विद्यालयात गुणवंतांचा गुणगौरव

(सेलू) ज्ञान मंदिरे ही समाजाचे व देशाचे भवितव्य आहेत, विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जडणघडण शाळेत होते,आजच्या आधुनिक काळात शाळेत गुणवत्ता पुर्ण शिक्षणासाठी भौतिक सुविधांची गरज असुन त्यासाठी लोकाश्रयाची नितांत आवश्यकता असून संघर्ष व कठोर परिश्रमातुनच यश प्राप्त होते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर यांनी केले.
येथील कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात कै.सौ राधाबाई व कै.किशनराव कान्हेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्य गुरूवार दि ५ जुलै रोजी आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मुंजाभाऊ भिसे, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे माजी सभापती अशोक काकडे,संतोष कुलकर्णी, संस्था सचिव चंद्रप्रकाशजी सांगतानी, जयप्रकाशजी बिहाणी,डॉ ए.एम.डख,सुनिल डख,प्रल्हादराव कान्हेकर,सी.टी.नावाडे,प्रा.नागेश कान्हेकर,राधाकिशन जवळेकर,जयसिंग शेळके, साईराज बोराडे,सिध्दूभाऊ खोसे, अनुप देशमुख यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १ ली ते १० वी तील गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व स्कुल बॅग देऊन गौरवण्यात आले. या मध्ये शेख रीहान, कृष्णा गिरी, आकाश सोळंके, यादव कोरडे, कृष्णा कुकडे, दिपक जास्वद, वैष्णवी पाटेकर, अनुराधा मिंड, साक्षी काळे, ज्ञानेश्वरी टिपरकर,रेणुका थोरात, नैतिक महाजन, ओमकार मिंड, संध्या गोरे, यश वैद्य, विनायक मिंड, दिव्या महाजन, राम खाकरे, स्वराज घनवट, राधिका जोगदंड, युवराज पौळ, कृष्णा बेंद्रे यांचा गौरव करण्यात आला.या प्रसंगी मा.सभापती अशोक काकडे,संतोष कुलकर्णी, जयप्रकाश बिहाणी ,प्रल्हादराव कान्हेकर यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याबाबत मनोदय व्यक्त करून संस्कारक्षम व गुणवंत विद्यार्थी घडवावेत असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.डी.शिंदे , सुत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर विजय हिरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ राजेंद्र मुळावेकर, संतोष सावंगीकर, बाबा जवळेकर, राम कान्हेकर, लक्ष्मण कान्हेकर, धनंजय कान्हेकर, पालक, माता पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी.आर.साखरे, बी.आर.रोडगे, रोहिदास चव्हाण,संतोष चारठाणकर, अभिमान पाईकराव, संदिप जुमडे, सौ उषा कामठे, सौ.सीमा ऊंडे, आनंद देवधर, बाबासाहेब टरपले, नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे,श्रीमती भारती मुळे आदींनी परिश्रम घेतले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button