अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक; शेतकऱ्यांचा संसार आला उघड्यावर…

जिंतूर : अचानक लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण साहित्य जळून भस्मात झाले ही घटना तालुक्यातील कोरवाडी येथील गट नंबर 236 मधील शेतात घडली असून या घटनेमुळे कष्टकरी शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
तालुक्यातील कोरवाडी येथील रामेश्वर हरसिंग राठोड (67) हे आपल्या पत्नी व मुलासह राहत असून दि.3 शुक्रवारी रोजी सकाळी 11:30 वा. राठोड यांच्या घराला अचानक आग लागली. शेतात काम करत असताना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या पत्नी, सुन व मुलासह घटनास्थळाकडे धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. उन्हाची तीव्रता पाहता त्यांचे अफाट प्रयत्न कमी पडले. अन पाहता पाहता संपूर्ण घराची राख रांगोळी झाली. आगीत सोयाबीन, नुकताच शेतातून काढलेला भुईमूग, कपडे, दोन स्प्रिंकलर सेट, नातवांचे शैक्षणिक साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे, अंगावरील घरात ठेवलेल सोन आणि लोखंडाच्या पेटीत ठेवलेली रोख रक्कम जळून खाक झाल्याने राठोड यांचे जवळपासप 3 लाखाचे नुकसान झाले असून राठोड कुटुंबियांचा संसार उघड्यावर आला आहे. आगीची माहिती मिळताच गावातील सरपंच दिनकर आलाटे यांनी ही माहिती तहसील प्रशासनास फोन द्वारे कळवून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सदरील घटनेचा पंचनामा तलाठी विकास आगलावे यांनी केला. मदतीची अपेक्षा असून तशी मागणीही आहे. राठोड कुटुंब यांना लागणारे संसार उपयोगी साहित्य मदत स्वरूपात पंचकोशातील नागरिकांनी आपल्या परिस्थितीनुसार मदतीचा हात द्यावा, असे आवाहन कोरवाडी येथिल दिनकर आलाटे यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button