शिक्षक समाजाचा योग्य दिशानिर्देशक – डॉ.हेमंत वैद्य…

सेलू / प्रतिनिधी
शिक्षक पिढी घडवतात तीच पिढी राष्ट्राचा कारभार चालवते.आदर्श समाज घडविण्यात शिक्षकांचा बहुमोल वाटा आहे.विद्यार्थ्यांच्या जीवनात नैतिक मूल्यांची रुजवणूक करून राष्ट्रभक्त व संस्कारी पिढी निर्माण करून समाजाला आदर्श करण्याचे प्रयत्न करत दिशा दर्शक भूमिका शिक्षक पार पाडतात असे प्रतिपादन भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य यांनी केले.भा.शि. प्र. संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात सत्रांत बैठकीत (३०एप्रिल मंगळवार) ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक अध्यक्ष हरिभाऊ चौधरी ,प्रमुख पाहुणे डॉ.हेमंत वैद्य ,स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर ,शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी ,मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.
सहशालेय उपक्रचा अहवाल विनोद मंडलिक व दीपाली पवार यांनी मांडला.मूल्यमापन विभागाचा अहवाल शंकर राऊत व काशिनाथ पांचाळ यांनी सादर केला.१ली ते ४ थी व ५ ते ८ वी विभागातील उपक्रमांची मांडणी अनुक्रमे रागिणी जकाते व अनिल कौसडीकर यांनी केली.विजय चौधरी यांनी प्रसिद्धी विभागाची माहिती दिली.उपेंद्र बेल्लूरकर व करुणा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप हरिभाऊ चौधरी यांनी केला.
सूत्रसंचालन गजानन साळवे ,पद्य विजय चौधरी ,प्रास्ताविक रागिणी जकाते ,आभार शंकर शितोळे यांनी मानले.शिक्षकांनी घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक व प्रशंसा मान्यवरांनी केली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button