राजकीय लोकांची मक्तेदारी संपवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात‌‌‌ मंगेश साबळे

_संदीप शिंदे पिंपरी राजा (जालना मतदार संघ)
शेतकरी पुत्र सरपंच ते खासदारकी मिळवणीच्या तयारीत असलेले मंगेश साबळे म्हणाले की रावसाहेब दानवे यांची दादागिरी संपवण्यासाठी मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून शेतीचे प्रश्न युवकांचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न श्रमिका चे प्रश्न गोरगरीब कष्टकरी जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला असून मी लाटेवरचा नाही तर वाटेवरचा खासदार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला
रावसाहेब दानवेंच्या विजयात मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे.
एकीकडे मोसंबीचा आगार, स्टील उद्योगाचं केंद्र तर दुसरीकडे मराठवाड्यातील दुष्काळ प्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या जालन्याची आणखी एक ओळख आहे, जालना लोकसभा मतदार संघ भाजपचा गड पर्यायाने रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला मानला जातो. 1999 पासून या मतदारसंघावर दानवे यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. 2009 चा अपवाद वगळता दानवेंचं मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व आहे. भाजपच्या अनुभवी आणि 35 वर्ष राजकरणात सक्रिय असलेल्या दानवेंच्या या गडात प्रतिस्पर्धी उमेदवार कल्याण काळे मंगेश साबळे व अन्य उमेदवाराच्या रूपाने निश्चित झालेले आहे
जालना लोकसभा निवडणुकीत ‘मराठा’ फॅक्टर महत्वाचा
जालना लोकसभा मतदारसंघात यावेळेस परंपरागत भाजप आणि काँग्रेसमध्ये लढतीची शक्यता जरी असली तरी मंगेश साबळे च्या रूपाने तिसऱ्या पर्यायाची व्यवस्था मतदारांना झालेली आहे राज्यात मराठा आरक्षणाची सुरुवात ज्या जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांचा रूपात झाली आहे त्यांच्या प्रत्येक आंदोलनात मराठा आंदोलक म्हणून मंगेश साबळेचा आक्रमक पुढाकार होता मराठा मतांवर प्रभाव असल्याने मतदारसंघात यावेळी निवडणुकीची झुंझार खेळी होऊ शकते.
मतदार संघात मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने स्टील उद्योगाचा केंद्र म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील दुष्काळ प्रवण क्षेत्र म्हणून सुद्धा या भागाची ओळख आहे, त्यामुळे इथले काही प्रमुख प्रश्न आणि समस्या आहेत, ज्याचा या निवडणुकीच्या रणसंग्रामात वाटा असणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलं, त्यांच्या निमित्ताने काही प्रश्न सुटले असले तरी काही बाकी आहेत,
भाजपचने उमेदवार म्हणून रावसाहेब दानवे यांचं नाव जाहीर केले असले तरी दानवेंना शह देण्यासाठी महविकास आघाडीकडून 2009 मध्ये कडवी झुंज देणारे कल्याण काळे यांचे नाव पुढे आलं त्यामुळे सलग पाच वेळा निवडून आलेले दानवे सहाव्यांदा दिल्ली दरबरी जातील की नाही, हे बघावं लागेल.
जालना मतदारसंघात बदनापूर, भोकरदन तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री ,पैठण या एकूण सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.


मतदारसंघाचा इतिहास
एकेकाळी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा
सन 1996 पासून ही जागा भाजपसाठी नेहमीच अनुकूल राहिली गेली. 7 टर्म या मतदार संघावरती भाजपचाच वर्चस्व आहे,यातील 5 टर्म सातत्याने रावसाहेब दानवे यांचाच विजय झालाय.
2009 मध्ये काँग्रेस उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध चांगली लढत दिली होती या लढतीत डॉक्टर कल्याण काळे यांचा 8 हजार 482 मतांनी पराभव झाला होता.

सध्या ‘या’ मतदारसंघात पाच जणांकडे विधानसभेची धुरा आहे
जालना : कैलास गोरंट्याल, काँग्रेस
भोकरदन : संतोष दानवे, भाजपा
बदनापूर : नारायण कुचे, भाजपा
सिल्लोड : अब्दुल सत्तार, शिवसेना शिंदे गट
पैठण : संदीपान भुंबरे, शिवसेना शिंदे गट
फुलंब्री : हरिभाऊ बागडे, भाजप
2019 निवडणुकीचा निकाल
मागील निवडणुकीत रावसाहेब दानवे 3 लाख 32 हजार 815 मतांनी विजयी झाले होते.
रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये सज्ज आहेत आशे प्रतिपादन संरपच मंगेश साबळे यांनी केले आहे

या मतदारसंघात जातीय समीकरणे


एकूण मतदान – 1938621 अंदाजे
स्त्री मतदार – 916319
पुरुष मतदार – 1018251
तृतीयपंथी मतदार – 51
जातीय समीकरणं
मराठा – 367460 – 19%
मुस्लिम – 348120 – 18%
ओबीसी – 580200 – 30%
बौद्ध – 328780 – 17%
इतर – 309440 – 16%


मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव
मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या जालन्यातूनच रावसाहेब दानवे आणि कोणाची लढत होतीय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचंबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या पूर्ण न केल्यामुळे मराठा समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय,जिल्ह्यात जरांगे यांना मिळालेला पाठिंबा पाहता, समाजातील सरकारविरोधात वातावरण निवडणुकीच्या मतदानात परावर्तित झाल्यास याचा फटका सत्ताधारी पक्षाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी या विषयी कोणती जाहीर भूमिका घेतली जरी नसली, तरी मधल्या काळात भाजपमधील वरिष्ठ नेते आणि त्यांनी जरांगे यांच्यावर केलेले आरोप पाहता, स्थानिक पातळीवर मनोज जरांगे पाटील आणि रावसाहेब दानवे यांच्यात अप्रत्यक्ष पणे टीका टिपण्णी झाली. साहजिकच याचा तोटा अधिक प्रमाणात सत्ताधारी पक्षाला पर्यायाने दानवेंना होऊ शकतो.
एकंदरीतच काय तर इतिहास पाहिला तर रावसाहेबांचा विजय हा सोप्पा दिसत असला तरीही मनोज जरांगे जर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेतर लोकसभा निवडणूक दानवेंना जड जाईल यात काही शंका नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button