स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद देणारा सोहळा – संतोष कुलकर्णी

सेलू/प्रतिनिधी
स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव ,सुप्त गुणांना चालना मिळते ,कलाआविष्कार घडतो म्हणून स्नेहसंमेलन हे निर्मळ आनंद देणारा सोहळा आहे असे प्रतिपादन व्हिजन इंग्लिश स्कुलचे संतोष कुलकर्णी यांनी याप्रसंगी केले.कुलकर्णी पुढे म्हणाले की शाळा ही गुणवत्ता,संस्कार व शिस्त यावर आधारलेली असते .विवेकानंद शाळेच्या शिक्षकांचे कौतुक त्यांनी केले,.
आरंभ है प्रचंड शौर्य गीताने,गजानना या गणेश आराधनेने तर महाराष्ट्राच्या वारकऱ्यांचे आराध्य विठू माऊलीच्या जयघोषाने तर मोबाईलच्या दुष्परिणामाचे महत्व तितक्याच शिताफीने पटवून देण्याचा कलेने उपस्थितांची मने विवेकानंद संकुलातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांनी आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमातून जिंकली.


अत्यंत नियोजन बद्ध आणि तितक्याच आगळ्या वेगळ्या पद्धतीने चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण पाहुण्यांच्या समोर सादरीकरण केले दिल है छोटासा या गीतावर चिमुकल्यानी टाळ्यांची दाद मिळवली. भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी घाम गळुनी गीताने तर डोळ्यांचे पारणे फेडले. शक्ती भक्ती चे प्रतीक मानल्या जाणाऱ्या केसरी के लाल गीताने हुबेहूब हनुमान भक्तीचे प्रदर्शन सादर करत वातावरण भक्तिमय केले.भारतीय वैज्ञानिकांना सलाम करण्याच्या दृष्टीने सातवीच्या वर्गातील मुलांनी चंद्रायांन सादर करून आपल्या पंखाना किती बळ आहे हे दाखवले,एकापेक्षा एक असे सरस सादरीकरणाने उपस्थित पालकांची मने जिंकली. महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक रुढीला चालना देणारे अनेक सादरीकरण आणि विचारधारेला गती देणारे संकुल म्हणून उपस्थितांना परिचय आला.सदरील कार्यक्रम हा चार सत्रात आयोजित करण्यात आला होता सकाळ सत्रात विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी घटकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तर,यश तुमची वाट पाहते -भाग्यश्री पुरी
यश हे प्रयत्नाने मिळत असते त्यामुळे विद्यार्थ्याने आपले प्रयत्न कधी सोडू नये यश हे पुढच्या वळणांवर तुमची वाट पाहते असे मत बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी व्यक्त केले.तसेच केंडप्रमुख एकनाथ जाधव यांनी देखील मार्गदर्शन केले.विवेकानंद संस्कार केंद्राचा वार्षिक आराखडा स्थानिक अध्यक्ष हरिभाऊ काका चौधरी यांनी मांडला.

मोठे स्वप्न पहा,अशक्य काहीच नाही – डॉ.शिवाजी मगर
मन लावून आपले ध्येय निश्चित करा त्यानुसार आपली वाटचाल आणि आपले प्रयत्न सातत्याने सुरू ठेवा मोठी स्वप्ने पहा अश्यक्य असे या जगात काहीच नाही असे आणि हे बळ आपल्याला गुरू देतात असे मत दुसऱ्या सत्रातील बक्षीस वितरण कार्यक्रमात तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांनी व्यक्त केले.यावेळी स्थानिक सदस्य आनंद देशमुख यांनी देखील मनोगत व्यक्त केले.तर कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल स्पष्ट केला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चेतन नाईक व आश्विनी पावसे तसेच कलाविष्काराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गायकवाड व विजय चौधरी यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button